पौष शुद्ध पौर्णिमेला मृग नक्षत्र, सिंह लग्न या शुभमुहुर्तावर सातारा जिल्ह्यातील पाली येथे श्री खंडोबा व म्हाळसादेवी यांचा विवाह झाला. याचीच आठवण म्हणून दरवर्षी या दिवशी जेजुरी येथे यात्रा भरते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे पौर्णिमेनिमित्त जेजुरी मध्ये गाढवांच्या खरेदी-विक्रीचा मोठा बाजार भरतो. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांच्या विविध भागांतून येथे मोठ्या प्रमाणात व्यापारी येतात. तसेच ही यात्रा भटक्या विमुक्त जाती - जमातीमधील विविध समाज बांधवांची यात्रा असल्याने त्या समजातील लोकही मोठ्या संख्येने यात्रेमध्ये दिसून येतात.